पतसंस्थेमध्ये आपले स्वागत
|
सन १९९० साली श्री. वाघोजीराव पोळ काकांनी सर्व सहकारी मित्रांच्या मदतीने पतसंस्था रजिस्टर करण्याचा निर्णय घेतला. दहिवडी हे माणगंगा नदीच्या तिरावर वसलेले गाव आहे. या गावात श्री. सिद्धनाथाचे जागृत ग्रामदैवत आहे. त्यावेळी सर्व मित्रांशी विचार करुन श्री सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्था हे नाव निश्चित केले आणि शेअर्स गोळा करण्यास सुरुवात केली. अशामध्ये लोकांकडून शेअर्स गोळा करताना काकांनी पैसे तुमचे बुडणार नाहीत माझ्यावर विश्वास ठेवा असे सांगुन शेअर्स गोळा केले. तत्काळ मंत्री अभयसिंहराजे भोसले (महाराज) यांची भेट घेऊन त्यांच्याकडून शिफारस पत्र घेतले व संस्था रजिस्टर झाली. लोकांचा विश्वास बसला.लोक हळुहळु पैसे ठेवू लागले.काका मिल्ट्री मध्ये असल्याने त्यांच्या अंगीच शिस्त बिनलेली. ती शिस्त कर्मचारी, संचालकांना लावल्याने हळुहळु संस्था आकार घेऊ लागली संस्थेने १६१ कोटी ठेवी जमा केल्या. २०१६ साली संस्थेने २०० कोटीचे उद्दिष्ट पार करण्याचा निश्चय केला आहे. संस्थेला गेल्या २५ वर्षात ऑडीट वर्ग 'अ' मिळाला.
|
|
ठेव योजना
|
|
|
|
कर्ज योजना
|
|
|
|
मुदत ठेव
|
|
|
|
दामदुप्पट योजना
|
|
|
|
संस्थेची वैशिष्टे
|
|
|